तपासाबाबत राज्य सरकारची खेळी!

 मुंबई : एल्गार परिषद आणि भीमा- कोरेगाव ही दोन स्वतंत्र प्रकरणे असल्याची भूमिका मांडत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणांच्या तपासाबाबत नव्या खेळीचे संकेत दिले. एकीकडे, भीमा- कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्य सरकारच करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे, 'एल्गार'चा तपास सरकारची खेळी! 'एनआयए'कडे सोपवून आंबेडकरी चळवळीस नक्षलवादी ठरविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणात पोलीस दलाचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला


Popular posts
कनिका आणि करोना: 900 पथकांमध्ये 9000 लोक करताहेत काम
उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत,न्यायालयाकडून गंभीर दखल ; फौजदारी कारवाईचे आदेश
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना जंतू संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जनता करफ्यूच्या केलेल्या आवाहनाचे पालन करून सायंकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
डॉकटर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव