विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट

विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट


मुंबई : कोरोना व्ह्ययरसच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार प्रभासने स्वतःला आयसोलेट केलं आहे. बाहबली फेम प्रभास नुकताच एका चित्रपटाचे शूटींग पूर्ण करून जॉर्जियाहून परत आला आहे आणि म्हणूनच त्याने स्वतः ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभासने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करुन याबद्दलमाहिती दिली आहे. दरम्यान अनेक प्रसिद्ध व्यक्ती विदेशातुन आल्यावर माहिती लपवन टवून लोकाध्य मिसळताना दिसत आहे. अशा परिस्थिती प्रभासच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. प्रभासने शनिवारी सोशल मीडियावर माहिती दिली की “परदेशात शुटींग करुन सुरक्षित परत आल्यानंतर कोविड -१९ चा वाढता धोका पाहत मी स्वतः ला अलग ठेवण्याचे ठरविले आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहात. अनुपम खेर आणि शबाना आझमी यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींनी परदेशातून परत आल्यानंतर स्वतः ला वेगळं केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते आयसोलेट दिलीप कुमार यांनीही सोमवारी सांगितले, की कोरोना व्ायरसमुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे अलगकेले आहे. ९७ वर्षीय अभिनेत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. देशातील मतांचा आकडा कोरोना व्ायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत देशात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी देशातील 3१५ लोकांना कोरोनाची लागण झाली. आताही संख्या वाढून ३४१ पर्यंत वाढली आहे. आज देशात २६ नवीन कोरोना संसर्गग्रस्त आढळले आहेत. देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या महाराष्टात सर्वाधिक आहे. येथे कोरोनामळे संक्रमित लोकांची संख्या ७४ आहे. त्याचबरोबर केरळमध्ये कोरोनाने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता ५२ झाली आहे. तर, आतापर्यंत राज्यात २ बळीगेले आहेत. कोरोना व्ायरसशी सामना करण्यासाठी २२ मार्चला देशात जनता कप! करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली IPLIC आहे. रविवारी, २२ मार्च सकाळी सातते रात्रीनऊवाजेपर्यंत जनता कार्य असणार आहे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला देशभर प्रतिसाद मिळताना पाहयला मिळतोय.


Popular posts
उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत,न्यायालयाकडून गंभीर दखल ; फौजदारी कारवाईचे आदेश
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना जंतू संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जनता करफ्यूच्या केलेल्या आवाहनाचे पालन करून सायंकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद
आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
डॉकटर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव